यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही – ॲड.श्रीकांत माळकर.

यावेळी बोलताना ॲड. माळकर पुढे म्हणाले,” आपले व्यक्तिमत्व घडवताना विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर मैदानी खेळ , व्यायाम , संतुलित आहार ,वाचन,मनन चिंतन,लेखन या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे तरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होईल.”

यावेळी युवावक्ते शिवम माळकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ , कु.शांभवी माळकर यांनी ‘ छत्रपती संभाजी महाराज ‘, तर कु.प्रज्ञा माळकर यांनी “सोशल मीडियात हरवलेली तरुणाई ‘ या विषयांवर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले.त्यांच्या वक्तृत्वाने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालशिवाजी तालीम मंडळाच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.

दरम्यान येथील मलिकजान बाबा दर्ग्याच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमास ॲड.उदय मोरे ,मेजर प्रा. के.एम.भोसले,राजू माळी,महेश कुंभार,कार्यक्रमाचे प्रसिध्दी विभाग प्रमुख अनिल खाडे , शिवाजी थोरवत, राजू थोरवत , भरमु मगदूम,बाळासो खाडे ,मदन गायकवाड , संजय नसलापुरे,सुनील खाडे,आनंदा खाडे , जमील जमादार , वस्ताद मिरासो फकीर , वस्ताद दत्तात्रय जाधव, बजरंगबली करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी.बी.साळुंखे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!